Thursday, February 3, 2011

युअर ऑर्डर डज मॅटर!!!


मीरा - ब्लॅक कॉफी बिना चिनी के, लडकीयोंको इंप्रेस करने के लिए?
जय - तुम तो ज्यादा इंप्रेस नही लग रही हो?
मीरा - आय फील लाईक प्युकींग...यककक

लव आज कल चित्रपटातील सैफ अली खान आणि दिपिका पदुकोने मधला हा संवाद. चित्रपटात दाखवलं जाणारं सर्वच काही खरं नसतं, पण या प्रसंगानंतर थिएटरमध्ये उपस्थित असलेलं प्रत्येक जोडपं एकमेकांकडे बघतं आणि मिश्किलपणे हसतं. कारण त्या प्रसंगामध्ये बऱ्याच जुन्या आठवणी घर करून असतात.

हल्ली पहिल्या डेटींगसाठी भेटायचा हॉट स्पॉट म्हणजे कॉफी शॉप. त्यामुळे तुम्ही ज्या प्रकारची कॉफी मागवाल त्यावरून तुमचा स्वभाव जज केला जातो. त्यामध्ये अर्ध्याहून अधिक मुले एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) किंवा अडल्ट हॉट चॉकलेट (फ्लेवर्ड विथ रम ऑर आयरीश क्रिम), तर मुली हॉट चॉकलेट (डार्क एन्ड स्ट्रॉग) किंवा कॅफे फ्रेडो (आइस कॉफी) ऑर्डर करतात. दोघानांही आपल्या ऑर्डर वरून आपला स्वभाव (खरा-खोटा) एकमेकांच्या लक्षात आणून द्यायचा असतो. पण खरी मजा तर पुढे येते, जेव्हा धाडस करून मागवलेली ती न आवडणारी कॉफी कडू किंवा फारच कोल्ड वाटायला लागते. मग काय, जिवावर आल्यासारखं एक एक घोट घेऊन खोटी स्माईल द्यायची आणि प्रसंग मारून न्यायचा, कारण तोपर्यंत समोरच्याचा खरा स्वभाव काय आहे याबाबत डोक्यात चक्र फिरायला लागलेली असतात. त्यामुळे तुमचा खरा स्वभाव हा तुम्ही कोणती कॉफी ऑर्डर करताय यावरून खरंच लक्षात लक्षात येतो का? तर त्याचं उत्तर होअसंच देता येईल. कारण हा पहिला प्रसंग संपुर्ण चित्र क्लीअर करतो.

दुसऱ्या भेटीत मग प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार ऑर्डर प्लेस करतात. मग मुलगा कॅफे लाटे (एक्सप्रेसो, मिल्क आणि फोम) आणि मुलगी कॅपॅचिनो (एक्सप्रेसो, मिल्क, फोम) मागवायला लागते. त्यानंतरच्या भेटींमध्ये मात्र मग व्हरायटी असते. प्रत्येकजण आपल्या रेग्युलर ब्रँडकडे वळतो आणि मग खऱ्या स्वभावानुसार (खिशाला काय परवडतंय, आपल्या पार्टनरला काय आवडतंय, क्वान्टीटी कशाची जास्त येते, कशाबरोबर एक्स्ट्रा क्रिम/चॉकलेट आहे किंवा मग आज काहीतरी नवीन ट्राय करूयात) यानुसार एक्सप्रेसो कॉन क्रिमा, कॉपीक्युनो, आईस एस्कीमो, हॉट मोकाविथ चॉकलेट सिरप, कॅरॅमल लाटे, चॉकलेट फॅंटसी, आयरीश कॉफी, कोल्ड कॉफी, फ्लेवर्ड कॉफी (चॉकलेट, आयरीश, कॅरॅमल), ब्लॅक कॉफी (एक्सप्रेसो, अमेरीकॅनो/रीस्ट्रेटो), ट्रॉपीकल-आईसबर्ग, हॉट चॉकलेट (थिक) ची ऑर्डर होते. अनेकवेळा तुमच्या भेटायच्या फेव्हरेट ठिकाणी व तिथल्या फेव्हरेट टेबलावर ऑर्डर न देताच फक्त इशाऱ्यावरूनच ऑर्डर येते, कारण तुम्हा दोघांव्यतिरिक्त तिथल्या वेटरलासुध्दा तुमचा स्वभाव लक्षात आलेला असतो. आणि गंमत म्हणजे म्हणूनच वेळ-प्रसंग बघून स्वभावानुसार कधी कधी तो पण नवीन नवीन ऑर्डर सुचवत असतो.

या जोडप्यांबरोबरच कॉफी शॉपमध्ये कोपरा अडवून बसलेलेलीही बरीचशी मंडळी असतात. कुणी पुस्तक वाचत, कुणी गिटार वाजवत, कुणी काही लिहीत, लॅपटॉपवर काम करत, तसेच फक्त बर्ड वॉचिंगलाही बरीच मंडळी नित्यनियमाने येऊन बसत असतात. पण मग त्यांच्या ऑर्डर्स या अनेकदा ठरलेल्या किंवा कॅफे मधल्या एकंदरीत वातावरणावरून ठरत असतात. उदा. बाजूच्या टेबलावर कोणी हाय हिलवाली येऊन बसली तर महाशयांची ऑर्डर एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) शिवाय काय असू शकते?

कॉफी बारमध्ये प्रत्येक स्वभावाच्या माणसासाठी काही ना काही तरी असतं आणि नसेल तरी ऑर्डर प्रमाणे बनवून दिलं जातं, म्हणूनच प्रत्येकाला तिथे एकदातरी जावसं वाटतं. त्यानंतर स्वभावानुसार तो किंवा ती पहिल्या विझिट नंतर पुर्णविराम देतात तर अनेकजण काही ना काही कारणाने तिथल्या वाऱ्या करायला लागतात. शेवटी हे त्यांना आवडणाऱ्या कॉफीवर आणि स्वभावावर अवलंबून आहे. म्हणूनच युवर ऑर्डर डज मॅटर!!!    

‘सवाई’ची मानकरी ‘गिरगाव व्हाया दादर’!


 वर्षभरातील एकांकिका स्पर्धांची फायनल आणि सर्वौत्तम एकांकिकांची मेजवानी म्हणजे चतुरंगची सवाई एकांकिका स्पर्धा. गेल्या 23 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला प्रारंभ होऊन प्रात:काली राष्ट्राला संपूर्ण वंदे मातरमने वंदन करून पारितोषिक वितरणाने संपन्न होणारी मुंबईतील, महाराष्ट्रातील, देशातील नव्हे तर (कदाचित) संपूर्ण जगातील सवाई ही एकमेव एकांकिका स्पर्धा असावी. एकूण 27 प्रथम पारितोषिक विजेत्यांमधून निवडल्या गेलेल्या सात एकांकिकांची अंतीम फेरी परवा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडली. दरवर्षी नेमाने नाट्य जागरण करणाऱ्या नाट्यप्रेमींनी यावर्षीही उत्स्फुर्त प्रतिसाह देत तासाभरातच तिकीटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकावला होता. या 24 व्या नाट्यजागरणाचा घेतलेला हा आढावा.
 
-----------------------------------

त्यांचा परफॉरमन्स झाला आणि नाट्यगृहात एकच चर्चा सुरू झाली, की आता दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार कोण? अनेकांनी तर प्रेक्षक पसंतीसाठी दिलेल्या पत्रिकेतील चार हा आकडा पण फाडून बाजूला ठेवल्याचं ऐकू येत होतं. कोण म्हणतं देणार नाय...घेतल्या शिवाय जाणार नाय... या घोषणा खऱ्या ठरवत परिक्षकांनी निकाल जाहीर करण्याअगोदरच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि व्हाया आयएनटी, मृगजळ असा प्रवास करत एम.डी. कॉलेजची गिरगांव व्हाया दादरही एकांकिका चोविसाव्या सवाई एकांकिका स्पर्धेत सवाई एकांकिका ठरली. महाराष्ट्र राज्य हे 2010-2011 वर्ष आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करीत आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी तरूण, बायका, म्हातारी मंडळी ते शाळेत जाणाऱ्या पोरांपासून सर्वांनीच यात सहभाग घेतला होता. परदेशी शक्तीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आपल्याच देशातील लोकांबरोबर लढताना 105 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा लढा कसा दिला गेला, ते दिवस कसे होते याचं चित्रण गिरगांव व्हाया दादर या एकांकीकेत करण्यात आलं आहे. दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांनी आपली कामगिरी चोख बजावली असली तरी लेखनात ही एकांकिका कमी पडते. पण पन्नासहून अधिक कलाकारांच्या साथीने उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि प्रसंगानुरूप अतिशय कल्पक नेपथ्याव्दारे व्दारे हा सारा लढा स्टेजवर पाहताना आपणही त्या काळात गेल्यावाचून राहत नाही. भूषण देसाई (सवाई प्रकाशयोजनाकार), सचिन गावकर ( सवाई नेपथ्य), अमोत भोर ( सवाई दिग्दर्शक) आणि प्रेक्षक पसंती ही पारितोषिके पटकावत सवाईमध्येही आपली घौडदौड कायम ठेवली. गिरवाव व्हाया दादरच्या जोडीने अनेक स्पर्धा गाजणाऱ्या व मृगजळमध्येही दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एक दोन अडीचया एकांकीकेला सवाईकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांना इथेही व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. थिअरी ऑफ रीलेटीविटीवर आधारीत ही एकांकिका फक्त दोनच पात्रांची होती. आयुष्यात कोणत्याही घटना या योगायोगाने होत नसून घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एकमेकांशी काही ना काही तरी संबंध असतो. जीवनात खचून न जाता समोर आलेल्या प्रत्येक अडचणींवर सकारात्मकपणे व शांतपणे विचार केला तर कुठल्याही कठीण प्रसंगातून सहजपणे मार्ग काढता येतो, हे निनाद लिमये व सुनिल तांबट या दोघांनी त्यांच्या दमदार परफॉरमन्सव्दारे दाखवून देऊन ते प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होतेच, पण निनाद लिमये हा तर सवाई अभिनेत्याचा दावेदार मानला जात होता. पण एकांकिका व्दितीय व सुनिल तांबट (सवाई लेखक) ही पारितोषिकं पटकावत थोडा लांबलेला परफॉरसऩ्स, संगीत आणि प्रकाशाच्या अभावामुळे ही एकांकिका पिछाडीवर पडली. 
सर्वच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतीम फेरीत हसखास आढळणारं, दमदार परफॉरमन्स देणारं व हमखास पारितोषिकं पटकावणारं कॉलेज म्हणजे डी.जी.रूपारेल कॉलेज. वेगळे विषय आणि तेवढीच वेगळ्या पध्दतीची मांडणी म्हणूच रूपारेलने नेहमीच आपली छाप पाडली आहे. यावर्षीची “18 Till I die” ही देखील तशाच वेगळ्या धाटणीची होती. सोशल नेटवर्कींगच्या जमान्यात फेसबुकवर टाकलेले स्टेटस् खरंच रीयल असतात का? त्यावर टाकलेल्या स्टेटसव्दारे खरंच आपल्याला काय म्हणायचंय, आपल्या मनातील भावना या लोकांपर्यंत पोहचत असतात का? तसेच दिसण्यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात की आपला स्वभाव आणि भावनांना अधिक महत्व असतं याचं उत्कृष्ट चित्रण या एकांकीकेत होतं. तुषार घोडीगावकरने साकारलेला नीरज तर सर्वांना आवडून गेलाच पण समृध्दी घुमरेच्या संयत अभिनयाने तिला सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून दिला. याच एकांकीकेच्यावेळी पुढच्या सीनची उत्कंठा वाढवणारा सीन संपल्यावर शेवटच्या सिनच्या आधी अचानक लाईट ट्रॅप झाले आणि परफॉरमन्स थांबला. काय झालं? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये चालू होताच लाईट ट्रॅप झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि चोख परफॉरमन्सला इथे खंड पडला. पण मग प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मिनिट भरातच पुढचा सीन सुरू झाला.

एकांकिका संपली की गरम चहा आणि कॉफीचे घोट घेत सिगरेटचे झुरके मारत चर्चा रंगत होत्या. रात्र जशी वाढत होती तशी डोळ्यावर झोपेची झापडंही चढत होती. पण खरी झोप उडवली ते मुंबईच्या ठाकूर महाविद्यालय, विज्ञान आणि वाणिज्य या कॉलेजच्या पडद्याआड हया एकांकीकेने. ही एकांकिका म्हणजे नव्या दमाच्या कलाकारांची खास मेजवीनी होती. एकांकीकेतील हेमा (वैभवी आंबोळकर), जया (सुवेधा देसाई) आणि बुवा (गौरव मोरे) या पात्रांची एनर्जी तोंडात बोटे घालायला लावणारी होती. समाजात माणसांमध्ये जातीवरून अजूनही भेदभाव केला जात असताना समाजाचं प्रतिबिंब, समस्या ज्या रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या जातात तिथेही प्रमुख कलाकार व बॅकस्टेज आर्टीस्ट हा भेदभाव कसा केला जातो हे अतिशय नेमक्याच नेपथ्याचा योग्य वापर करून विनोदी पध्दतीने मांडण्यात आलं होतं. कुठल्याच बाबतीत फारसा दम नसलेली ही एकांकिका हाय एनर्जी परफॉमन्स आणि काही चांगल्या व पीजे छाप विनोदांनी सर्वांचं मनोरंजन मात्र करून गेली. लवबर्ड्स, वि.वा.ट्रस्ट, विरार या एकांकीकेत तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना सतत मनाची कशी घालमेल होत असते हे दाखवण्यात आलं होतं. प्रेम म्हणजे नक्की काय? मनानं एकमेकांच्या जवळ असणं की शरीरांनं? याचा उलगडा होत नसतो. मित्रांचं ऐकायचं, की आपल्या मनाला जे योग्य वाटतंय ते करायचं या दोलायमान स्थितित मन असतं.  आपण शरीराने जवळ आलो तरच आपल्यातलं नातं अधिक घट्ट होईल अशा स्वभआवाचा तो आणि आपली इच्छा नसतानासुध्दा जर तु हे केलंस तर आपण शरीराने तर जवळ येऊ पण मनाने नाही हे समजावणारी ती या एकांकीकेत होते. लेखनातून बाहेर आलेले काही मजेदार प्रसंग सोडले तर या एकांकीकेत नवीन असं काहीच नव्हतं. अशीच आणखी एक एकांकिका म्हणजे झुंपा लाहिरी यांच्या कथेवर आधारलेली पर्णिका संस्था, मुंबईची दि लास्ट डीनर. जुना विषय आणि ठिसाळ मांडणी यामुळे एकांकीकेतील अनेक कच्चे दुवे समोर येत होते. लाऊड म्युझीक आणि वाईट प्रकाशयोजना यामुळे ही एकांकिका फार रंगलीच नाही.

एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुण्याच्या “HTTP 404: Page Not Found” ने मात्र तगडा परफॉरमन्स देत क्रमांकासाठीची दावेदारी कायम ठेवली होती. थोड्या वेगळ्या आणि थेट तरूणांशी निगडीत विषयावर भाष्य करणारी ही एकांकिका होती. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं आणि पालक यांच्या नात्यात झालेला बदल आणि त्याला चांगल्या-वाईट या दोन्ही अर्थांनी मिळालेली इंटरनेटची (पर्यायाने सोशल नेटवर्कींग साईटची) साथ कशाप्रकारे खऱ्या नात्यांतला गोडवा नष्ट करून व्हर्च्युअल रीएलीटीमध्ये जगण्यात कसा आनंद देत आहे हे मांडण्यात आलं होतं. लेखनात चांगली उतरलेल्या ह्या एकांकीकेने शेवटचा दमदार परफॉरमऩ्स देत स्पर्धेतील निकालातील उत्कंठा कायम ठेवण्यात भरपूर मदत केली. या एकांकीकेतील प्रमुख भूमिका करणाऱ्या आरोह वेलणकरने अपक्षेप्रमाणे सवाई अभिनेत्याच्या ट्रॉफीवर नाव कोरलं तर सवाई ध्वनीसंयोजनाचं पारितोषिक रोहित वेखंडे यानं पटकावलं.
एकंदरीत यावर्षीच्या स्पर्धेत तरूणांचे प्रश्न मांडणाऱ्या, तरूणांना ज्या प्रश्नांबद्दल आपुलकी आहे अशा विषयांच्या एकांकिका पहायला मिळाल्या. अंतीम फेरीचे परिक्षक म्हणून अभिनेते सदाशिव अमरापूरकर, संगीत कुलकर्णी आणि नाट्य लेखक आनंद म्हसवेकर यांनी काम पाहिले.  

Monday, January 24, 2011

‘धोबी घाट’ उत्तरोत्तर रंगत जाणारी डायरी...


फार पुर्वी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, एक प्रसिध्द इंग्रजी लेखक मुंबईत आला होता आणि मुंबईतील धोबी घाटाचं वर्णन करताना तो म्हणाला होता की इथे रोज सकाळी काही लोक ओल्या कपड्याने काळा दगड फोडायचा प्रयत्न करतात, दगड फुटत नाही पण प्रयत्न त्याच जोमाने चालू राहतो. हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच किरण राव दिग्दर्शित धोबी घाट (मुंबई डायरीज्) हा चित्रपट पाहिला. वर नमूद केल्याप्रमाणे त्या इंग्रजी लेखकाने मुंबईच्या माणसांवर, त्यांच्या स्वभावावर भाष्य केलं होतं. धोबी घाटमध्ये सुध्दा तेच आहे. दोन तासांहून कमी लांबीचा, मध्यांतर नसलेला हा चित्रपट एक वेगळी छाप सोडून जातो. अंतर्मुख होऊन आपला आपल्याच विचार करायला भाग पाडतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांची कामे उत्कृष्ट झाली आहेत. मुख्य म्हणजे आवश्यक तेवढेच संवाद आणि संगीताचा योग्य वापर यामुळे मुंबईची ही डायरी उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत जाते. 

जगाच्या नकाशावर मुंबईला एक वेगळं अस्तित्व आहे. इथल्या लोकांबाबत फार पुर्वीपासून सर्वांना कुतूहल वाटत आलंय. त्यांचं राहणीमान, त्यांचे स्वभाव, जगण्याची पध्दत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जगभरातल्या पर्यटकांबरोबरच, भारतातल्या कुठल्याही गावातील असो वा शहरातील व्यक्तीस मुंबईला आवर्जुन भेट द्यायची असते. तिथे राहणारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याबद्दल त्याला अप्रूप असतं. म्हणूनच घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या मुंबईच्या माणसाच्या भाव-भावनांचं चित्र रेखाटणं आव्हानात्मक काम आहे. धोबी घाट (मुंबई डायरीज्) मध्ये किरण राव यांनी हे आव्हान यशस्विरित्या पेलल्याचं दिसतं. चित्रपटातील चारही प्रमुख भूमिकांच्या माध्यमातून मुंबईचं अस्सल रूप समोर येतं. खरं तर चित्रपटातील गोष्टी या नवीन नसून त्या ज्या पध्दतीने मांडल्या गेल्या आहेत, ते वाखाणण्याजोगं आहे. कुठेही भंपकपणाचा आव न आणता, कमीत कमी पात्रांद्वारे आणि उत्कृष्ट पटकथेमुळे ह्या चित्रपटात अनेक प्रसंगांनंतर वाह...क्या बात है! हे बोलायला भाग पाडतो, यातंच त्याचं यश लपलेलं आहे.



Thursday, November 25, 2010

असावा सुंदर चॉकलेटचा मनोरा...


दिल्ली गुरगाव येथील अ‍ॅम्बीयन्स मॉल लोकांनी खचाखच भरला होता. सर्वजण त्या सुवर्णक्षणाची आतुरतेने वाट बघत होते. मॉलच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील सर्व पायऱ्यांवर लोकांनी मोक्याच्या जागा पटकावल्या होत्या. त्याला निमित्तही तसेच होते. कितीही मोठे असले तरी हाताच्या मुठीत मावणारे चॉकलेट आज मिठी मारूनसुद्धा पकडता येणार नाही अशी परिस्थिती होती. मास्टरशेफच्या टायटल ट्रॅकवर सर्वाचेच पाय थिरकत असताना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत चमूने हा चॉकलेट एक्लेअर हा भारतातील सर्वात उंच म्हणजेच २६.८ फूट आहे असे जाहीर करताच मॉलमध्ये एकच जल्लोष झाला. जवळपास ५०० हून अधिक लोकांच्या साक्षीने भारतातील सर्वात उंच चॉकलेट एक्लेअर पिरॅमिड म्हणून यावर शिक्कामोर्तब झाले. स्टार प्लस वाहिनीवरील अमूल पुरस्कृत ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धक आणि दी लीला केम्पन्स्की (दिल्ली) च्या स्वयंपाकघरातील कुशल बल्लवाचार्य अर्थात शेफ यांच्या चमूने ७२ तासांच्या प्रयत्नातून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवून विक्रम केला. 
एक हजार लिटर दूध, ८०० किलो पीठ, वीस हजार अंडी, ५०० किलो अमूलचे लोणी, ४५० किलो चॉकलेट, १६ हजार चॉकलेट फिल्ड एक्लेअर्स वापरून हे पिरॅमिड तयार केले होते. तीन वेगवेगळ्या थरांमध्ये तयार केलेले भाग एकत्रित करून मग ते सुरक्षितरीत्या एकमेकांवर रचण्यात आले. त्यानंतर रोलर ब्रशच्या साहाय्याने पिरॅमिडचा आकार देण्यात आला. 
‘आम्ही जे ठरवले होते, आमचे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून चमूचे प्रमुख व दी लीला हॉटेलचे कार्यकारी बल्लवाचार्य थॉमस फिगोव्क यांनी विक्रम नोंदवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आजवर वेगवेगळे सन्मान मिळाले पण लिम्का बुक विक्रम करण्याचा सन्मान हा जगमान्य आहे. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील नव्या दमाच्या १२ बल्लवाचार्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेदार होता, असेही त्यांनी सांगितले. 
देशाच्या विविध राज्यांतून नावाजलेले नव्हे तर घरच्या घरी पाककलेत ‘मास्टर’ असलेले हे बल्लवाचार्य ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाद्वारे प्रथमच लोकांसमोर आले आणि अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यांनी कार्यक्रमातून दाखविलेल्या अनेक पाककृतींची चव आता प्रेक्षकांच्या घरातील मंडळींमध्येही चाखली जात आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या अनोख्या विक्रमामुळे तर हे या नवोदित ‘मास्टरशेफ’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. ‘टेस्टी डिश वरना गेम फिनीश’ असे वारंवार म्हणणारा अक्षयकुमार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून त्याने सांगितलेला हा कानमंत्र लक्षात ठेवूनच चांगली चवदार डिश तयार करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो, असे स्पर्धक जयनंदन भास्कर याने सांगितले.  
लिम्का बुकात नोंदलेल्या या विक्रमाचा महत्त्वाचा भाग असलेले आणखी दोन जण म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील प्रमुख बल्लवाचार्य कुणाल कपूर आणि अजय चोप्रा. देशात पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमाद्वारे विक्रम नोंदविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे असे मत या दोघांनी व्यक्त केले. 
नेहमीचा रेसिपी कार्यक्रम करण्यापेक्षा वेगळे काही करण्याच्या विचाराचा भाग म्हणजेच हा ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रम होय, असे ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या या प्रवक्त्यांनी सांगितले. 
हा विक्रम पाहायला आणि त्या भव्य चॉकलेट पिरॅमिडची चव चाखायला दिल्लीतल्या मॉलमध्ये खवय्या आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली होती.

मुंबईकर प्रितेश चोटानीची निवड
‘मास्टर शेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धकांमध्ये मुंबईचा प्रितेश चोटानी याचीही निवड झाली असून तो एका कंपनीत ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून काम पाहतो. घरात बल्लवाचार्य आणि घराबाहेर ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून तो लीलया वावरतो. अत्यंत व्यस्त कार्यक्रमांतूनही तो आठवडय़ातून निदान ४-५ वेळा तरी स्वत: काहीतरी पाककृती बनवतो. तयार केलेल्या पाककृतींचे फोटो काढून त्याचे डॉक्यूमेंटेशनही तो आवर्जून करतो. विशेष म्हणजे एकदा तयार केलेला पदार्थ पुन्हा पुन्हा बनवायचा नाही यावर त्याचा भर असतो. सूत्रसंचालक आणि अभिनेता अक्षय कुमार याच्यासाठी नवनवीन पाककृती तयार करताना खूप मजा येते असे सांगून प्रितेश म्हणाला की, एकदा चॉकलेट आणि मँगो पराठा बनवला. त्याची चव घेताना अक्षय कुमारने बटर ऐवजी तूप वापरले असते तर पदार्थ अधिक चवदार झाला असता अशी सूचना केल्याचे त्याने आवर्जून सांगितले. खवय्येगिरी आणि खवय्यांसाठी पाककृती बनविण्याची प्रचंड आवड असलेल्या प्रितेशचा यासंदर्भात ब्लॉगही आहे. नवीन पाककृती तयार करून त्याची माहिती या ब्लॉगद्वारे तो लोकांपर्यंत पोहोचवितो. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमामुळे त्याच्या ब्लॉगलाही तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे प्रितेशने सांगितले. मास्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम दर शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्लस वाहिनीवरून दाखविण्यात येतो.

Friday, November 5, 2010

मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!


कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला,
दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला,
कंदिल बनवण्यासाठी रात्रभर जागरण करायला,
अक्षयकुमारसारख्या ड्रेससाठी आईकडे ह्ट्ट धरायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

रात्री उशीरा झोपूनही पहाटे आईच्या एका हाकेने जागं व्हायला,
पहिल्या आंघोळीनंतर कारेटं फोडायला जोर लावायला,
अंगाला येणा-या सुगंधी उटण्याचा वास घ्यायला,
नवीन कपडे घालण्याची आतुरतेने वाट बघायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

घरोघरी जाऊन फराळावर यथेच्छ ताव मारायला,
बहिणीने काढलेली रांगोळी विस्कटायला,
भावंडांबरोबर दंगा करून घर डोक्यावर घ्यायला,
फुटलेल्या फटाक्यांच्या कच-यात न फुटलेले फटाके शोधायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

आजी-आजोबांसाठी हाताने भेटकार्ड बनवायला,
दिवाळी गृहपाठाची वही सजवायला,
गड-किल्ले बांधण्याची धमाल पुन्हा अनुभवायला,
हस्तकलेसाठी मिठाईचे बॉक्स जमवायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

मामाला फटाक्यांसाठी मस्का लावायला,
‘एवढेसेच फटाके’? म्हणून अन्नत्याग करायला,
प्रदुषणाची तमा न बाळगता भरपूर फटाके फोडायला,
फोडलेल्या फटाक्यांच्या कागदांचा धूर करायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!


फटाक्यांच्या बॉक्सवरचे रंगीत स्टीकर्स जमवायला,
दिवाळीची सुट्टी संपली म्हणून खट्टू व्हायला,
शाळेतल्या दोस्तांना दिवाळीतली धमाल रंगवून सांगायला,
पुढच्या दिवाळीची आतुरतेने वाट पहायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!
                                  

                                  - प्रशांत ननावरे
                                  6 नोव्हेंबर 2010

Monday, October 25, 2010

Mumbai Film Festival 2010 Diary - Day 3 & 4...

Day 3...

Today I started with Dimension Mumbai  24 Shorts by young talents. The coordinator of this competition said that there were around 140 entries and they short listed 24 amongst them. It's good to see young talents shorts along with the films which have been accepted worldwide as an extraordinary product. Today when I got into the theater it was houseful and it was full with youngsters and critics. I got the corner seat and got angry with myself. When month back ago MAMI made an announcement about this competition I had decided that this year I will be sending my entry to this competition but somehow I couldn't manage it. If I could have done that, who knows I would have been invited here as an guest to present for first screening of my movie in International film festival. But now thats a past now. I better give a shot next time. I saw all 24 shots and amongst the some were really good though frankly speaking there was not a single unique concept presented by any of them.  But I must mentioned here about Maaneque, Mumbaikar Ganesh, Dahihandi and The endless life which stood separately in this competition. I was very disappointed thinking that, there are so many youngsters who can really give something new and extraordinary but it's now coming out through this festival. I was a part of the theater group in my college. We used to take part in many one act play competitions and get amazed all the time how can someone come up with such a strong script. That I haven't seen here this time. Last 2 years there were some brilliant ideas presented by youths but I don't know why this time that charm was not there.There were some well made films but the subjects and treatment was known to all. Anyways let's hope next time will have some good stuff.  Congratulations to all.

Lets move to now next film which was from Georgia called 'SUSA' by Rusudan Pirveli. This is a story of a young boy (Susa) living somewhere outside the capital city of Tbilisi who day dream to escape the reality of his poverty. It's a 85 mints movie which is worth watching the struggle of Susa. After this I moved to screen 4 where they were screening Yoshishinge Yoshida's reminiscent of the great Hollywood melodramas of the 1960's, 'Akitsu Hot Springs' which was embellished with a plaintive string-laden music score. The next one was Biutiful, which I missed it day before yesterday. Uxbal is criminal who makes his money off the underground factories in Barcelona. His steadily expanding criminal activities include the Senegalese drug mafia, Chinese sweatshops and even a scam to develop a plot that belong to cemetery where his father's grave is. After watching this movies I realized that why people were fighting day before yesterday to watch this. It was really worth watching movie which started at 10.30pm and got over around 00.45am. All the characters of Uxbal family was superb. I must mentioned here the role played by Uxbal two kids were awesome. The way they have played their character, u will surely fall in love with them, which I did.    

Day 4...

Monday starts with "Next year in Bomaby'. This documentary is based on the lives of the BEne Israeli community of Indian Jews who sought asylum from religious persecution in India over 2000 years ago. It's a well researched and well made documentary which provoke you to think about this community and help them out. The best thing was today the entire team was present for the screening and we got an opportunity to interact with Producer, Director and two key characters of this movie. I felt that every small community also  has some significance to our large community. Their economical, social and cultural contribution to the local communities is lot less than any other original big community of this place.

Though it's an international film festival and 90% movies you can watch are from different countries there where some special screening of India movies too. Today from that category we watched Mrunal Sen's Khandhar. I know that I don't have to give introduction about him and his films. He is master, that's it I can say about him. Really enjoyed the film. The show was houseful and because of  overwhelming response the organizers announced one more screening of this film at 10.30pm on same day. Anu Kapoor, Pankaj Kapoor, Nasiruddin Shah and Shabana Azami what an amazing star-cast. They all have done great job. When you watch these peoples old and even new movies you get an answer why these are not in a race of award. I feel they all are above that. They don't need certificate (award) that they have done good job. For them it's ongoing process from long time and without any hurdles they are faithful to their work. One more thing is I never found Shabana Azami so beautiful before this. Hats off to all. 

After this I thought I will watch Marathi movie today but I end up watching very nice French movie called 'The Killer Queen'. Her first true passion is poker. It's all about how her passion quickly turns to an unhealthy addiction that beings to eat away at her life. It's a well made 96mints film which is lead role (Mathilde) played by Adrienne Paul who have done justice with this character. That's it for today :)

     




Saturday, October 23, 2010

Mumbai Film Festival 2010 Diary - Day 2...

Watched three movies today. First was 'For 80 days' from Spain by Jon Garano & Jose Mari Goenaga. It's a movie of two old women Maita and Anux who meet coincidentally in hospital after many years. When they were teenage girls in secondary school, it was a time when their friendship could never exceed a socially stipulated boundary. And yet, they were very much in love.Despites the years gone, their emotional bonds remains unchanged. It's a beautifully made movie. I must mentioned here about Anux husband in film. He had done good job in small role. I was thinking after this movie that, we always meet many old friends during festivals. Sometime you make many new friends in festivals. Who give a place in long que, buy popcorn for you, inform you time to time which movie is better, what to watch and what not. It's a fun when after movie you discuss over tea and cigarets. We always think my interpretation is right and we expect from other that they should also believe in that. I have seen in these festivals, many have made their choice to live together. 


Anyways, coming to next movie which i actually missed that is from Spain-Mexico 'Biutiful' by Aljandro Gonzalez Inarritu. Today again there was a rush like yesterday for this movie. Actually there were more people today than yesterday for this this movie. This time police came to resolve the problem and finally movie started 30 minus late and those who cold not able to make it today, the show have been organised for them tomorrow 10.30pm. So I am happy that still I have one chance to watch this movie. Will tell you about this movie tomorrow once I watched. Because I missed this movie I watch South Africa movie 'Florida Rod'. Nothing much special about this movie. Same old story and all major characters were Indian. I always hate myself when I don't like the fact that Indian actors should not speak in English. They look so odd when they act. But I should change  my view point and take this seriously, that is not to hate them. 


The last film was amazing and Director Carlos Gaviria was himself present for his movie today in the theater. 'Retratos en un mar de mentiras' from Colombia. Never thought that Colombia is so beautiful. Really love the cinematography.  The cross country journey of brother and sister pt them right in the mouth of the social and political problems Colombia faces. The actress Marina (character name) has done a great job. With very few dialogged she tell so many thing by her expressions. Also Jairo did justice with his character and help u lot to hold the movie for two hours. I think that's enough for today. see you tomorrow.