Sunday, November 16, 2014

'एलिझाबेथ एकादशी' : 'टीकाऊ'पणाचं अफलातून लॉजिक

'एलिझाबेथ एकादशी' हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट, तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतर स्व:कडे आकर्षित करण्याच्या साध्या ग्रँव्हिटीच्या नियमामध्ये कमालीचा चपखल बसतो. खुद्द पंढपुरात फक्त चार दिवसांमध्ये घडणारी एक सरळ साधी गोष्ट. पण ती मांडताना दिग्दर्शकाने केलेले आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि बौध्दीक व्यवस्थेचे चित्रण केवळ लाजवाबच म्हणता येईल.
रूप-रंग, श्रीमंती, व्यवसाय या सर्वच पातळीवर आबाळं असलेला परंतु तरीही देव म्हणवला गेलेला असा विठ्ठल हा सामांन्याचे श्रध्दास्थान. तीच बाब सायकलची. त्यामुळे या दोघांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांना मुर्ख न समजता त्यांच्या विचारक्षमतेला आव्हान देत, संवेदनशीलतेचा ठाव घेत आणि निखळ मनोरंजन करतानाही आजच्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत हा चित्रपट सुरू होतो आणि संपतो. परंतु, विशेष म्हणजे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही विचार करायला भाग पाडत राहतो.
पंढरपूर आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येणारा उत्सव, लोकांची श्रध्दा, संत साहित्य, परंपरा, तेथील जनजीवन, राहणीमान, लोकांचे स्वभाव ह्या सर्व गोष्ठी चित्रपटात आहेतच. पण त्याचबरोबरीने शिक्षण (शिष्यवृत्ती परीक्षा), विज्ञान (न्यूटनला देव्हा-यात स्थान ), सरकारी कायदे , सेक्सच्या (उत्सवाच्या काळात चालणारा वेश्याव्यवसाय) पातळीवर टँबू मानल्या गेलेल्या गोष्टी दिग्दर्शकाने इतक्या सहजसुंदरपणे यामध्ये गुंफल्या आहेत त्याला तोड नाही. त्यामध्येही वैचारिक खाद्याची आस असलेल्यांना ते आणि केवळ मनोरंजन हवं असणा-यांना ते या चित्रपटातून एकाच वेळी पुरेपूर मिळतं हे विशेष.
आई-मुलं, सासू -सून आणि आजी-नातवंड यांच्यातील नातं खूप गोड पध्दतीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. मुलांचे स्वभाव आणि मैत्री दाखवताना त्यामधील सहजता जपण्यात आली आहे. नवरा गेल्यावर स्वेटर तयार करून, जेवणं बनवून मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली आईची दगदग, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पाच हजार जमवण्यासाठी चाललेली धडपड, घराच्या मालकिणीचा व्यवहारीपणा आणि चांगुलपणा, गावातील आणि गावाबाहेरून आलेल्या व्यक्तींच्या स्वभावातले बारकावे दिग्दर्शकाने इतक्या सहजपणे पकडले आहेत की ती मंडळी पडद्यावर अभिनय करतायत असे वाटतंच नाही.
चित्रपटातील संवाद ही सर्वात जमेची बाजू. ते लहान मुलांच्या तोंडी देतानाही उपदेशपर वाटणार नाहीत आणि त्यांनी केलेले विनोद सर्व वयोगटातील लोकांना आपलेसे वाटतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. किर्तनांचा आणि गोष्टींचा केलेला वापर जबरदस्त. या चित्रपटातील एकमेव गाणं हे श्रवणीय तर आहेच पण त्याहीपलिकडे त्या गाण्यातून आजच्या समाजजीवनावर केलेलं टोकेरी भाष्य अफलातूनच म्हणावं लागेल. इग्लंडची राणी एलिझाबेथ ही बराच काळ टिकली. त्यामुळे 'एलिझाबेथ' म्हणजे 'टीकाऊ' आणि म्हणूनच सायकलचं नाव एलिझाबेथ. हे 'टीकाऊ'पणाचं लॉजिक अनेकअर्थांनी या सिनेमालाही तंतोतंत लागू पडतं.
चित्रपटाची कथा कशी पुढे सरकते हे पडद्यावर बघण्यात आणि संवाद पात्रांच्या तोंडून ऐकण्यात मजा आहे. त्यामुळे ते देण्याचा मोह मी टाळला आहे

Sunday, November 2, 2014

कविता : जगणे...!

तळणे, मळणे, उकडणे
झटपट संपवून टाकणे

शिजवणे, भिजवणे, परतवणे
तात्पुरती काळजी मिटवणे

वाळवणे, मुरवणे, सुकवणे
भविष्याची तरतूद करणे

कुटणे, भरडणे, वाटणे
तोंडी लावायला करणे

गाळणे, तापवणे, उकळवणे
स्वच्छतेसाठी झगडणे

कुस्करणे, चेचणे, दाबणे
अस्तित्व मिटवून टाकणे

गिळणे, चघळणे, चावणे
तजवीज करणे

मारणे, सोडणे, टाकणे
मोकळे होणे

खाणे, पिणे, श्वासोच्छवास करणे
जिवंत असणे

व्यक्त होणे, लढणे, झगडणे
जगणे...!

Saturday, September 13, 2014

पनवेल-सियाचेन.. एक सायकल प्रवास!

एका मराठी तरुणाची साहसकथा
कधी राजस्थानातला प्रचंड उष्मा तर कधी हिमाचलातला प्रचंड पाऊस, कधी शून्य तापमान तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमान.. या अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो न थकता दिवसाला १२५ किमी अंतर कापत होता, तेही सायकलवरून! पनवेलच्या सुमीत परिंगे या तरुणाची ही साहसकथा आहे. जगातील सर्वात उंच लष्करी तळावर डोळ्यात तेल घालून मायभूचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांना अभिवादन म्हणून सुमितने पनवेल ते सियाचेन हा प्रवास सायकलवरून करण्याचे ठरवले. तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सुमीतचे सियाचिन येथे लष्करी तळावर स्वागत करण्यासाठी बेस कमांडर, एअर बेस कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर असे लष्कराचे एकूण २५ अधिकारी उपस्थित होते. सुमीतने हडपसरच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल फॅकल्टी या विषयात पदवी प्राप्त केली आहे.

रोजचा दिनक्रम
जम्मूपर्यंत दरदिवशी साधारण १२५ किलोमीटर आणि त्यानंतर ७० ते ८० किलोमीटर अंतर सुमीत रोज पार करत होता. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या कॅनंडेल कंपनीच्या सायकलनेही उत्तम साथ दिली. या संपूर्ण प्रवासात मंदिर, धर्मशाळा, आश्रम, लॉजेस आणि आर्मी कॅम्प हे वास्तव्याचे ठिकाण आणि रस्त्यांवरील ढाबे हे खाण्याचे ठिकाण होते.

पहिलाच भारतीय
सियाचेनपर्यंत सायकलने प्रवास करणाऱ्या सुमीतने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पनवेल ते कन्याकुमारी हे १७०० किमीचे अंतरही सायकलने पार केले होते. त्यामुळे देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

१५० किलोमीटर आणि सहा तास
सियाचेन बेस कॅम्पला जाण्यासाठी सामान्य नागरिकांना विशेष परवानगीची आवश्यकता असते. पनामिकच्या पुढे सामान्य नागरिक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या विशेष परवानगीसाठी पनामी ते प्रतापपुरा हा जवळपास १५० किमीचा अतिरिक्त प्रवास सुमीतला करावा लागला. पनामिकमध्ये लष्कराच्या तीन मेजरना भेटण्यासाठी त्याला तब्बल सहा तास वाट पहावी लागली.

शिक्षण संपवून नोकरीला लागण्याआधी अनेकांना फिरण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते, परंतु मला सर्वात आधी आपला देश फिरायचा आहे. त्यासाठी सायकल हे उत्तम वाहन असून त्याचा फायदा आपोआप सायकलिंगच्या प्रचारासाठीही होतो. - सुमीत परिंगे

Monday, August 4, 2014

Korlai Fort , Maharashtra

Korlai Fort is a Portuguese fortification in the town of Korlai, Maharashtra. It was built on an island which guards the way to the Revdanda Creek. It was meant as a companion to the fort at Chaul. At this strategic position the Portuguese could use it to defend their province which stretched from Korlai to Bassein. Vestiges of the Portuguese occupation are manifested in the distinct dialect of the Korlai villages inhabitants which is a Luso-Indian Portuguese Creole called Kristi.







Tuesday, July 29, 2014

'बुध्दीबळ' आणि 'गोट्या'

'बुध्दीबळ' हा खेळ बुध्दीवादी लोकांचा समजला जातो. ध्यान, मनन, चिंतन, संयम आणि पराकोटीची विचार करण्याची क्षमता हे सर्व गुण तुमच्याकडे असतील तर त्या पटावरचे तुम्ही राजे असता, त्यामुळे सदन वर्गाचा खेळ म्हणूनच त्याकडे पाहिले गेले आणि जात आहे.... याउलट, दुसरा खेळ म्हणजे 'गोट्या'. साधारण मध्यमवर्गातही मोठ्या प्रमाणावर एका ठराविक वयापर्यंत या खेळाचे आकर्षण असते. मातीतला आणि कुठलीही कुशलता नसलेला खेळ असा त्याचा लौकीक....
पण आज या दोन्ही खेळांवर कुरघोडी करणारा आणि विशेषत: बुध्दीवाद्यांना तोंडघशी पाडणा-या खेळाशी ओळख झाली. मस्जिद रेल्वे स्थानकावर रंगलेला हा खेळ पाहून आम्ही चक्रावून गेलो. 'गोट्यांच्या सहाय्याने बुध्दीबळातील प्यादी नामोहरम करण्याचा हा खेळ' म्हणजे सामान्य विचारक्षमतेच्या कैक पलिकडे जाऊन निर्मिलेला हा खेळ आहे.
या खेळाच्या त्याच्या काही गमतीही आहेत. म्हणजे यामध्ये दोन्ही रंगांचे प्यादे एका सरळ रेषेत मांडलेले असतात.
पहिल्याच फटक्यात तुम्ही राजालाही चेकमेट करू शकता.
तुम्ही उडविलेल्या सोंगट्यांचा हिशेबही तुम्हालाच ठेवावा लागतो.



Sunday, July 27, 2014

Offroad biking : Charkop-Marve-Manori

Yet another off road biking rout explored. It was around 50-55km ride, Charkop-Marve-Manori (by Ferry boat to go opposite side)-Uttan-Kashimira-Charkop. When I started in the morning, it was not decided that, I will ride on this rout. 
But when I crossed over a creek and heading towards Uttan, on my left side, I found a small lane, which was going towards beach. There is small PIR BABA Darga as well so tempted to go and see the place. 
But that rout took me to rock land. I climbed up with my cycle and opposite side I found another muddy road. It is just 200mtr. Uphill and reach to the plateau. Where you find a small pond where Ducks were enjoying. 
That rout continue with bit downhill again towards beach. It ends where you see; it’s like a deep valley in front of you. Coming back again on plateau, I found another rout on my left.
Started following that rout… muddy, greenery around, which was finally, took me to smooth road. From there back to Uttan road... Met with the rain on my way back to home by Kashimira till Charkop.

* All photos by Prashant Nanaware.  

Friday, July 18, 2014

ट्रेकर ब्लॉगर : सायकलवरून अरुणाचल प्रदेश

















उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलचा अंतर्गत भाग आजदेखील अनेक बाबतीत दुर्गमच आहे. या प्रदेशात पर्यटकदेखील फारसे भेट देत नसताना, सात मराठी सायकलस्वारांनी मात्र मनसोक्त सायकली दौडवून अनोखी दिवाळी साजरी केली. 

असा झाला सायकल प्रवास
सोळा दिवसांमध्ये साधारण साडेसातशे किलोमीटर सायकलिंग झाले. साडेसात हजार फुटांवरून सुरुवात केल्यानंतर आम्ही जवळपास साडेआठ फुटांपर्यंत सायकल वरून आलो. मुंबई-कोलकाता-दिब्रूगढ (आसाम) असा विमानप्रवास केल्यानंतर, दिब्रूगढच्या मोहनबारी विमानतळ ते तिनसुखिया हा तीस किलोमीटरचा प्रवास टेम्पोमध्ये पॅक केलेल्या सायकल टाकून केला. दुसऱ्या दिवशी तिनसुखिया (आसाम) ते अरुणाचल प्रदेश आणि आसामची सीमारेषा असलेल्या दिराक गेटपासून सुरू झालेला सायकल प्रवास भारत-चीन सीमारेषेला भोज्जा करून, म्यानमारमध्ये साधारण १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून पुन्हा एकदा आसाममधील तिनसुखिया या शहरात येऊन थांबला. दिराक गेट - तेजू - सलंगम - हायलिआंग - चांगवन्ती - वालाँग आणि परशुराम कुंडावरून परत येताना ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या स्टिलवेल किंवा लिडो रोडवरून सायकलिंग केलं. याच रस्त्यावर असलेल्या लेखापानी या सद्य:स्थितीत सुरू नसलेल्या ईशान्येकडील भारताच्या शेवटच्या रेल्वे स्थानकालाही भेट दिली.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उगवत्या सूर्याचा प्रदेश

तिथून सायकलिंग करतच पांगसाऊ पासपर्यंत गेलो. हा पास भारत आणि म्यानमारच्या सीमेवर आहे. तिनसुखियापर्यंतच्या परतीच्या प्रवासात जयरामपूर तसेच दिगबोईमध्ये असलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाला आणि ज्या ठिकाणी भारताला पहिल्यांदा तेल सापडलं त्या जागी उभारण्यात आलेल्या म्युझियमलाही भेट दिली. वाटेत वाक्रो - जागून - खरसांग - जयरामपूर - मार्गारेटा - तिनसुखिया करत पुन्हा एकदा मुंबईसाठी दिब्रूगढहून आकाशाच्या दिशेने झेपावलो.


Sunday, June 15, 2014

Offroad Biking : Charkop - Uttan beach - Gorai creek - Charkop

Another offbeat Sunday ride! It was a total 52km ride including 6-7km off road. Charkop,Kandivali - Uttan beach - off road - Gorai creek - Charkop. Uttan is a coastal town just north of Mumbai in Thane district. The area has a significant East Indian Catholic population. Next to the beach there is famous Our Lady Of Velankani Shrine.It is an important aspect in the life of native Uttankars(people staying in uttan). On my way back met some cyclist friends who showed the new off road biking route. We were lucky enough to get very sweet Karvanda (fruit). When we were tired enough after riding in mud, on one request we got to drink cold water from deep well. The off road meets Uttan's famous destination Keshavsrushti. From there, another 7km ride to Gorai creek. and we loaded our bike on boat to reach another side of creek. After reaching home 2 glass of Nimbu Sharbat and Chicken-Bhakri in lunch make your Sunday ride worthy.

























* All photos by Prashant Nanaware

Friday, June 13, 2014

साहस : रेस अक्रॉस अमेरिका!

सायकल रेस म्हटलं की सगळ्यांना टूर द फ्रान्स आठवते, पण त्याहीपेक्षा अवघड रेस आहे ती 'रॅम'. म्हणजेच 'रेस अक्रॉस अमेरिका'. बारा दिवसांत चार हजार आठशे किलोमीटर अंतर सायकलवरून आख्खी अमेरिका पार करायच्या या स्पर्धेसाठी सुमीत पाटील या मराठी तरुणाची निवड झाली.























अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमितचे वडील आरसीएफमध्ये नोकरीला असून, आई टपाल खात्यात आहे. सुमितला संगीताची उत्तम जाण असून, तो उत्तम बासरीवादकही आहे. त्यामुळे मुंबईबाहेर लांबच्या सायकल टूरवर सुमितसोबत जाणाऱ्या मित्रांना दिवसभर सायकल चालविल्यानंतर रात्री सुरेल बासरीवादनाची ट्रीट ठरलेली असते.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RAAM साठी सुमीत पाटील या मराठी तरुणाची निवड

गेल्या चार वर्षांत सुमितने सायकलिंग करताना ५० हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर बीआरएम स्पर्धामध्ये भाग घेताना पाच हजार चारशे किलोमीटर सायकल चालवली आहे. 'डेझर्ट-५००' आणि 'अल्ट्रा बॉब'सारख्या अतिउष्ण प्रदेशात सायकल चालवण्याच्या स्पर्धाचाही अनुभव सुमितच्या गाठीशी आहे. विशेष म्हणजे, आजवर सुमितने सायकलवर पार केलेले सर्व अंतर मोजल्यास ते अंतर एका जगप्रदक्षिणेहूनही अधिक भरेल.

Thursday, March 20, 2014

मराठमोळा सुमित पाटील जगातील सर्वात कठीण सायकल स्पर्धेत

जगात सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम जवळपास २००० हून अधिक व्यक्तींच्या नावावर आहे. मात्र, इतिहासातील सर्वात कठीण 'रेस अक्रॉस अमेरीका' (RAAM) ही सायकल स्पर्धा आजवर जेमतेम २०० सायकलस्वारांनाच पूर्ण करता आली आहे. यावरूनच या स्पध्रेसाठी लागणारी कसोटी लक्षात येईल. अशा या खडतर स्पध्रेसाठी अलिबागचा मराठमोळा सुपुत्र सुमित पाटील हा २८ वर्षीय तरूण पात्र ठरला आहे. हा मान मिळवणारा सुमित केवळ तिसरा भारतीय आहे. मात्र आधीच्या दोघांना ही स्पर्धा पूर्ण करता आलेली नाही, त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय होण्याचा आपला मानस असल्याचा विश्वास सुमितने 'लोकसत्ता'शी बोलताना व्यक्त केला. सविस्तर वाचा.























आर्थिक मदतीचे आवाहन
स्पर्धेचा एकूण खर्च जवळपास ५० लाख रुपयांच्या घरात जाणार आहे. हा सर्व खर्च स्वबळावरच उभा करावा लागणार आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी'टीम अग्नी' ची स्थापना करण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती www.sumitpatil.com या संकेस्थळावर जाऊन सुमितला स्पर्धेसाठी आर्थिक हातभार लावू शकतात. 

Wednesday, February 5, 2014

Enduro3 : The Adventure Race

A team sport, an Adventure Race tests the competitors’ physical and mental endurance. The teams cover a vast area; navigating from checkpoint to checkpoint steering past a combination of disciplines like orienteering and navigation, cross-country running, mountain biking, paddling and climbing and related rope skills. NECC NEF Enduro3, the adventure race is India’s first and only adventure race. We able to finish this race in 26 hours and was at 6th place in our category, which had 17 teams. (Amature Mix).