Thursday, November 25, 2010

असावा सुंदर चॉकलेटचा मनोरा...


दिल्ली गुरगाव येथील अ‍ॅम्बीयन्स मॉल लोकांनी खचाखच भरला होता. सर्वजण त्या सुवर्णक्षणाची आतुरतेने वाट बघत होते. मॉलच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील सर्व पायऱ्यांवर लोकांनी मोक्याच्या जागा पटकावल्या होत्या. त्याला निमित्तही तसेच होते. कितीही मोठे असले तरी हाताच्या मुठीत मावणारे चॉकलेट आज मिठी मारूनसुद्धा पकडता येणार नाही अशी परिस्थिती होती. मास्टरशेफच्या टायटल ट्रॅकवर सर्वाचेच पाय थिरकत असताना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत चमूने हा चॉकलेट एक्लेअर हा भारतातील सर्वात उंच म्हणजेच २६.८ फूट आहे असे जाहीर करताच मॉलमध्ये एकच जल्लोष झाला. जवळपास ५०० हून अधिक लोकांच्या साक्षीने भारतातील सर्वात उंच चॉकलेट एक्लेअर पिरॅमिड म्हणून यावर शिक्कामोर्तब झाले. स्टार प्लस वाहिनीवरील अमूल पुरस्कृत ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धक आणि दी लीला केम्पन्स्की (दिल्ली) च्या स्वयंपाकघरातील कुशल बल्लवाचार्य अर्थात शेफ यांच्या चमूने ७२ तासांच्या प्रयत्नातून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवून विक्रम केला. 
एक हजार लिटर दूध, ८०० किलो पीठ, वीस हजार अंडी, ५०० किलो अमूलचे लोणी, ४५० किलो चॉकलेट, १६ हजार चॉकलेट फिल्ड एक्लेअर्स वापरून हे पिरॅमिड तयार केले होते. तीन वेगवेगळ्या थरांमध्ये तयार केलेले भाग एकत्रित करून मग ते सुरक्षितरीत्या एकमेकांवर रचण्यात आले. त्यानंतर रोलर ब्रशच्या साहाय्याने पिरॅमिडचा आकार देण्यात आला. 
‘आम्ही जे ठरवले होते, आमचे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून चमूचे प्रमुख व दी लीला हॉटेलचे कार्यकारी बल्लवाचार्य थॉमस फिगोव्क यांनी विक्रम नोंदवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आजवर वेगवेगळे सन्मान मिळाले पण लिम्का बुक विक्रम करण्याचा सन्मान हा जगमान्य आहे. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील नव्या दमाच्या १२ बल्लवाचार्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेदार होता, असेही त्यांनी सांगितले. 
देशाच्या विविध राज्यांतून नावाजलेले नव्हे तर घरच्या घरी पाककलेत ‘मास्टर’ असलेले हे बल्लवाचार्य ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाद्वारे प्रथमच लोकांसमोर आले आणि अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यांनी कार्यक्रमातून दाखविलेल्या अनेक पाककृतींची चव आता प्रेक्षकांच्या घरातील मंडळींमध्येही चाखली जात आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या अनोख्या विक्रमामुळे तर हे या नवोदित ‘मास्टरशेफ’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. ‘टेस्टी डिश वरना गेम फिनीश’ असे वारंवार म्हणणारा अक्षयकुमार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून त्याने सांगितलेला हा कानमंत्र लक्षात ठेवूनच चांगली चवदार डिश तयार करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो, असे स्पर्धक जयनंदन भास्कर याने सांगितले.  
लिम्का बुकात नोंदलेल्या या विक्रमाचा महत्त्वाचा भाग असलेले आणखी दोन जण म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील प्रमुख बल्लवाचार्य कुणाल कपूर आणि अजय चोप्रा. देशात पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमाद्वारे विक्रम नोंदविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे असे मत या दोघांनी व्यक्त केले. 
नेहमीचा रेसिपी कार्यक्रम करण्यापेक्षा वेगळे काही करण्याच्या विचाराचा भाग म्हणजेच हा ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रम होय, असे ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या या प्रवक्त्यांनी सांगितले. 
हा विक्रम पाहायला आणि त्या भव्य चॉकलेट पिरॅमिडची चव चाखायला दिल्लीतल्या मॉलमध्ये खवय्या आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली होती.

मुंबईकर प्रितेश चोटानीची निवड
‘मास्टर शेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धकांमध्ये मुंबईचा प्रितेश चोटानी याचीही निवड झाली असून तो एका कंपनीत ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून काम पाहतो. घरात बल्लवाचार्य आणि घराबाहेर ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून तो लीलया वावरतो. अत्यंत व्यस्त कार्यक्रमांतूनही तो आठवडय़ातून निदान ४-५ वेळा तरी स्वत: काहीतरी पाककृती बनवतो. तयार केलेल्या पाककृतींचे फोटो काढून त्याचे डॉक्यूमेंटेशनही तो आवर्जून करतो. विशेष म्हणजे एकदा तयार केलेला पदार्थ पुन्हा पुन्हा बनवायचा नाही यावर त्याचा भर असतो. सूत्रसंचालक आणि अभिनेता अक्षय कुमार याच्यासाठी नवनवीन पाककृती तयार करताना खूप मजा येते असे सांगून प्रितेश म्हणाला की, एकदा चॉकलेट आणि मँगो पराठा बनवला. त्याची चव घेताना अक्षय कुमारने बटर ऐवजी तूप वापरले असते तर पदार्थ अधिक चवदार झाला असता अशी सूचना केल्याचे त्याने आवर्जून सांगितले. खवय्येगिरी आणि खवय्यांसाठी पाककृती बनविण्याची प्रचंड आवड असलेल्या प्रितेशचा यासंदर्भात ब्लॉगही आहे. नवीन पाककृती तयार करून त्याची माहिती या ब्लॉगद्वारे तो लोकांपर्यंत पोहोचवितो. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमामुळे त्याच्या ब्लॉगलाही तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे प्रितेशने सांगितले. मास्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम दर शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्लस वाहिनीवरून दाखविण्यात येतो.

Friday, November 5, 2010

मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!


कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला,
दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला,
कंदिल बनवण्यासाठी रात्रभर जागरण करायला,
अक्षयकुमारसारख्या ड्रेससाठी आईकडे ह्ट्ट धरायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

रात्री उशीरा झोपूनही पहाटे आईच्या एका हाकेने जागं व्हायला,
पहिल्या आंघोळीनंतर कारेटं फोडायला जोर लावायला,
अंगाला येणा-या सुगंधी उटण्याचा वास घ्यायला,
नवीन कपडे घालण्याची आतुरतेने वाट बघायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

घरोघरी जाऊन फराळावर यथेच्छ ताव मारायला,
बहिणीने काढलेली रांगोळी विस्कटायला,
भावंडांबरोबर दंगा करून घर डोक्यावर घ्यायला,
फुटलेल्या फटाक्यांच्या कच-यात न फुटलेले फटाके शोधायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

आजी-आजोबांसाठी हाताने भेटकार्ड बनवायला,
दिवाळी गृहपाठाची वही सजवायला,
गड-किल्ले बांधण्याची धमाल पुन्हा अनुभवायला,
हस्तकलेसाठी मिठाईचे बॉक्स जमवायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!

मामाला फटाक्यांसाठी मस्का लावायला,
‘एवढेसेच फटाके’? म्हणून अन्नत्याग करायला,
प्रदुषणाची तमा न बाळगता भरपूर फटाके फोडायला,
फोडलेल्या फटाक्यांच्या कागदांचा धूर करायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!


फटाक्यांच्या बॉक्सवरचे रंगीत स्टीकर्स जमवायला,
दिवाळीची सुट्टी संपली म्हणून खट्टू व्हायला,
शाळेतल्या दोस्तांना दिवाळीतली धमाल रंगवून सांगायला,
पुढच्या दिवाळीची आतुरतेने वाट पहायला,
मला पुन्हा लहान व्हायचंय, दिवाळी साजरी करायला!
                                  

                                  - प्रशांत ननावरे
                                  6 नोव्हेंबर 2010

Monday, October 25, 2010

Mumbai Film Festival 2010 Diary - Day 3 & 4...

Day 3...

Today I started with Dimension Mumbai  24 Shorts by young talents. The coordinator of this competition said that there were around 140 entries and they short listed 24 amongst them. It's good to see young talents shorts along with the films which have been accepted worldwide as an extraordinary product. Today when I got into the theater it was houseful and it was full with youngsters and critics. I got the corner seat and got angry with myself. When month back ago MAMI made an announcement about this competition I had decided that this year I will be sending my entry to this competition but somehow I couldn't manage it. If I could have done that, who knows I would have been invited here as an guest to present for first screening of my movie in International film festival. But now thats a past now. I better give a shot next time. I saw all 24 shots and amongst the some were really good though frankly speaking there was not a single unique concept presented by any of them.  But I must mentioned here about Maaneque, Mumbaikar Ganesh, Dahihandi and The endless life which stood separately in this competition. I was very disappointed thinking that, there are so many youngsters who can really give something new and extraordinary but it's now coming out through this festival. I was a part of the theater group in my college. We used to take part in many one act play competitions and get amazed all the time how can someone come up with such a strong script. That I haven't seen here this time. Last 2 years there were some brilliant ideas presented by youths but I don't know why this time that charm was not there.There were some well made films but the subjects and treatment was known to all. Anyways let's hope next time will have some good stuff.  Congratulations to all.

Lets move to now next film which was from Georgia called 'SUSA' by Rusudan Pirveli. This is a story of a young boy (Susa) living somewhere outside the capital city of Tbilisi who day dream to escape the reality of his poverty. It's a 85 mints movie which is worth watching the struggle of Susa. After this I moved to screen 4 where they were screening Yoshishinge Yoshida's reminiscent of the great Hollywood melodramas of the 1960's, 'Akitsu Hot Springs' which was embellished with a plaintive string-laden music score. The next one was Biutiful, which I missed it day before yesterday. Uxbal is criminal who makes his money off the underground factories in Barcelona. His steadily expanding criminal activities include the Senegalese drug mafia, Chinese sweatshops and even a scam to develop a plot that belong to cemetery where his father's grave is. After watching this movies I realized that why people were fighting day before yesterday to watch this. It was really worth watching movie which started at 10.30pm and got over around 00.45am. All the characters of Uxbal family was superb. I must mentioned here the role played by Uxbal two kids were awesome. The way they have played their character, u will surely fall in love with them, which I did.    

Day 4...

Monday starts with "Next year in Bomaby'. This documentary is based on the lives of the BEne Israeli community of Indian Jews who sought asylum from religious persecution in India over 2000 years ago. It's a well researched and well made documentary which provoke you to think about this community and help them out. The best thing was today the entire team was present for the screening and we got an opportunity to interact with Producer, Director and two key characters of this movie. I felt that every small community also  has some significance to our large community. Their economical, social and cultural contribution to the local communities is lot less than any other original big community of this place.

Though it's an international film festival and 90% movies you can watch are from different countries there where some special screening of India movies too. Today from that category we watched Mrunal Sen's Khandhar. I know that I don't have to give introduction about him and his films. He is master, that's it I can say about him. Really enjoyed the film. The show was houseful and because of  overwhelming response the organizers announced one more screening of this film at 10.30pm on same day. Anu Kapoor, Pankaj Kapoor, Nasiruddin Shah and Shabana Azami what an amazing star-cast. They all have done great job. When you watch these peoples old and even new movies you get an answer why these are not in a race of award. I feel they all are above that. They don't need certificate (award) that they have done good job. For them it's ongoing process from long time and without any hurdles they are faithful to their work. One more thing is I never found Shabana Azami so beautiful before this. Hats off to all. 

After this I thought I will watch Marathi movie today but I end up watching very nice French movie called 'The Killer Queen'. Her first true passion is poker. It's all about how her passion quickly turns to an unhealthy addiction that beings to eat away at her life. It's a well made 96mints film which is lead role (Mathilde) played by Adrienne Paul who have done justice with this character. That's it for today :)

     




Saturday, October 23, 2010

Mumbai Film Festival 2010 Diary - Day 2...

Watched three movies today. First was 'For 80 days' from Spain by Jon Garano & Jose Mari Goenaga. It's a movie of two old women Maita and Anux who meet coincidentally in hospital after many years. When they were teenage girls in secondary school, it was a time when their friendship could never exceed a socially stipulated boundary. And yet, they were very much in love.Despites the years gone, their emotional bonds remains unchanged. It's a beautifully made movie. I must mentioned here about Anux husband in film. He had done good job in small role. I was thinking after this movie that, we always meet many old friends during festivals. Sometime you make many new friends in festivals. Who give a place in long que, buy popcorn for you, inform you time to time which movie is better, what to watch and what not. It's a fun when after movie you discuss over tea and cigarets. We always think my interpretation is right and we expect from other that they should also believe in that. I have seen in these festivals, many have made their choice to live together. 


Anyways, coming to next movie which i actually missed that is from Spain-Mexico 'Biutiful' by Aljandro Gonzalez Inarritu. Today again there was a rush like yesterday for this movie. Actually there were more people today than yesterday for this this movie. This time police came to resolve the problem and finally movie started 30 minus late and those who cold not able to make it today, the show have been organised for them tomorrow 10.30pm. So I am happy that still I have one chance to watch this movie. Will tell you about this movie tomorrow once I watched. Because I missed this movie I watch South Africa movie 'Florida Rod'. Nothing much special about this movie. Same old story and all major characters were Indian. I always hate myself when I don't like the fact that Indian actors should not speak in English. They look so odd when they act. But I should change  my view point and take this seriously, that is not to hate them. 


The last film was amazing and Director Carlos Gaviria was himself present for his movie today in the theater. 'Retratos en un mar de mentiras' from Colombia. Never thought that Colombia is so beautiful. Really love the cinematography.  The cross country journey of brother and sister pt them right in the mouth of the social and political problems Colombia faces. The actress Marina (character name) has done a great job. With very few dialogged she tell so many thing by her expressions. Also Jairo did justice with his character and help u lot to hold the movie for two hours. I think that's enough for today. see you tomorrow. 


       

Friday, October 22, 2010

Mumbai Film Festival 2010 Diary - Day 1...

Today 22 October 2010 (actually now its yesterday) was first day of  Mumbai Film festival 2010 (MAMI). I wanted to start from morning show (10.30am) but I couldn't make it. I started with second show (12.30pm), Akira Kurosawa Movie 'No  Regrets For Our Youth' (1946). An epic drama of feminist self-discovery, this is Akira Kurosawa's firsh major work. I found this film is very inspirational and very thought provoking. As a youth today many of us don't think about long term solutions to any problem. We are fast food generation but it's very hard to fight for cause any battle and give your entire life for that. We always in search of happy safe life and run away from struggle and truth. This is 'must watch' movie not only for Kurosawa but also for leading actors Setsuko Hara and Susumu Fujita.

The third show was of Canadian movie 'Everybody's Couch' (2009) by Dominic Desjardins. It's a same old journey movie, but present it in different way. The film character Zoe (actress) and Alex (actor) you meet first time in this movie. They are different and make this journey worth watching. We finished this movie at 5.00pm and ran to screen 3 in PVR cinema for opening film of this festival 'The Social Network'. There was a big Que for this movie. The movie is based on the book The Accidental Billionaires: The founding of Facebook, a Tale of Sex, Money, Genius and Betrayal by Ben Mezerich, The Social Network tells a fictionalized version of the founding of Facebook. Amazing movie. The single message which I got from this movie is 'If you have an outstanding idea, don't think much, implement it at any cost. If it's really worth, you will be successful and people will appreciate it. This is a story of film, but today important thing had happened behind the screen. As I mentioned it earlier there was long que for this movie. The sitting capacity of auditorium is 300 and over 800 people were standing in a que. At 5.30 volunteers had closed the doors saying that, auditorium is full, there are no seats available inside and movie was started. But around 500 people waiting outside to go in. Somehow I manage to get into the auditorium. As soon as I went inside I fond only two journalist were fighting with organizers that how can they closed the door and start screening the movie when people are waiting outside. the people who got the place, they were sitting calmly and watching the show. I kept my bag on one empty seat and joined those journalist. We told them that kindly stop the screening and allow other people inside. If there are no seats available people can sit on staircase and will watch the movie (that's how its work in all film festivals). But organizers were giving us reason that it's a security issue. We spoke to audience that how can you watch movie while others are waiting outside, 'Don't you have self respect that your a true film lover and you should fight for others too'. After this, everybody joined us and asked to stop  the screening. Then entire auditorium joined us and management had to stop the screening and they let other inside. Finally we won. I am sure this would have been updated on everybodys facebook status while all this was happening or after that. And thats what the movie all about. the social network!

Today's last movie we watched was from South Koria - Hahaha. Very interesting and funny concept. Two friends talk about their adventures while on holiday, they decided to reveal only their pleasant memories, and neither realised they were both in the same place and same time, with the same group of people. Movie really holds your attention for all two hours and refresh you. 

In and out first day was good. Four different movies from different countries was nice experience. Hope to see more good work in coming week.    
     

Thursday, October 21, 2010

फूल मूनच्या साक्षीने

तुम्हाला काय प्यायचंय ते प्या रे. मी माझी व्यवस्था केलेली आहे.
गौरव फोनवर बोलत असतानाच कोणीतरी दाराची बेल वाजविली, तर दार उघडताच सोसायटीतल्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या टोळीने एकच कल्ला केला. सर्वाना शांत करीत गौरवने विचारले, काय हवंय?
टोळीचं नेतृत्व करणारा चिंटू म्हणाला, कोजागिरीची वर्गणी.
किती? गौरवने विचारले,
चिंटू म्हणाला, पन्नास रुपये फक्त.
गौरवने विचारलं, काय करणार पन्नास रुपयांचं?
चिंटू म्हणाला, भरपूर मसाला दूध पिणार. आणि जोडीला सामोसे आणि चिप्स पण ठेवले आहेत त्याचं काय? गुड्डीने चिंटूकडे डोळे वटारूनच पुस्ती जोडली.
दूध??? असं म्हणत गौरव हसत हसतच आत गेला आणि पन्नास रुपये आणून देऊन चिंटूच्या हातावर ठेवत म्हणाला, जा मजा करा, दूध प्या आणि पुन्हा मोठय़ाने हसतच त्याने होल्डवर ठेवलेला फोन कानाला लावला. फोन कानाला लावताच समोर फोनवर असलेल्या शरदने विचारले, असे हसतोयस का?
गौरवने लागलीच झालेला प्रकार सांगितला. दूध पिणार म्हणे भरपूर, असं म्हणत, पुन्हा हसायला लागला. आपण तर बाबा खंबे तयार ठेवले आहेत. चल उद्या भेटू असं म्हणत, नेहमीसारखा उशीर करू नकोस सांगत गौरवने फोन कट केला.
हिंदू कालमानानुसार हा अश्विन महिना आणि त्यात येणारी पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी
पौर्णिमा. पौर्णिमेच्या रात्री जागं राहणे म्हणजे कोजागर, म्हणे आज जागे राहतात त्यांना लक्ष्मी धन वाटते; पण या गोष्टीशी कसलंच घेणं-देणं नसलेल्या गौरव आणि त्याच्या मित्रांनी कर्जतला शरदच्या फार्म हाऊसवर पार्टी (म्हणजेच दारुची) करण्याचा बेत आखला होता. दूध वगैरे लहान मुलं पितात. आपले तर आता गर्लफ्रेंड बरोबर मस्त चांदण्या रात्रीचा आनंद लुटत चीअर्स करण्याचे दिवस आहेत. असं त्यांचं म्हणणं होतं.
ठरल्याप्रमाणे गौरव, शमिका, शरद, कौमुदी, राजा, संतोष, मोनिका, सोडा म्हणजेच गिरीश, तानिया, टोपी, केतकी असे सर्व जण एकत्र जमले. फार्म हाऊसला एक मोठा बगीचा होता, मोठं टेरेस आणि अगदी दोनशे मीटरच्या अंतरावरून वाहणारी नदी होती. त्यामुळे या वेळेची पार्टी भलतीच रंगणार म्हणून सर्व जण खुशीत होते. शरद सतत किचनमध्ये का फेऱ्या मारतोय म्हणून गौरव किचनमध्ये गेला आणि शरदने गॅसवर दूध तापवायला ठेवलंय हे पाहून मोठमोठय़ाने हसू लागला, त्या आवाजाने सर्व जण काय झालं हे बघायला किचनमध्ये जमा झाले.
काय झालं रे एवढं मोठय़ाने हसायला? रोहनने विचारलं, चांगला मूड क्रिएट होत होता आणि तू सगळा सत्यानाश केलास. असं म्हणताच केतकी लाजली.
काही नाही रे, हा बघ ना, फ्रिजरमध्ये बीअर चिल्ड करायला ठेवायची सोडून दूध गरम करतोय. बच्चा कुठचा.
तू काहीही म्हण, पण मी दूध पिणार. अरे त्यात वेगळी मजा असते, तुम्हा दारू पिणाऱ्यांना नाही कळणार, असं म्हणत शरद पुन्हा हातातील चमच्याने ते ढवळून किती घट्ट झालंय आणि केशर ड्रायफूट नीट मिक्स झाले आहेत ना याचा अंदाज घेऊ लागला.
रम, वोडका, विस्की, बीअर, टकिलाच्या बाटल्या टेबलावर दिमाखात उभ्या होत्या आणि जोडीला चकणा होताच. प्रत्येकाने आपापला पेग तयार केला. सर्व तयारी झाल्यावर सर्व जण अंगणात गोल करून बसले होते. इतक्यात शरद मगाशी गॅसवर तापत असलेलं गरमा गरम दुधाचं पातेलं दोन्ही हातात पकडून घेऊन आला. त्याच्या आगमनानेच मसाला दुधाच्या सुंदर वासाने सारा परिसर दरवळून गेला. त्यानं पातेलं सर्वाच्या मधोमध ठेवलं आणि चंद्राचा अंदाज घेऊ लागला. कौमुदी त्याला मदत करीत होती. सर्व जण आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. शरदने अगदी योग्य अंदाज घेऊन पातेलं ठेवलं होतं. पूर्ण गोल चंद्राचं अगदी छान, मनमोहक प्रतिबिंब त्यात पडलं होतं. सर्व जण मगाशी शरदला हसले असले तरी या गोष्टीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. ठपाठप अंधारात कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले. तिथे टोपी आधीच टाइट झाल्याने, तो पातेल्यामध्ये आपला चेहरा पाहून म्हणाला, सांका कोण दिसतोय चंद्रासारखा? मी की चंद्र? यावर सगळेजण खळखळून हसले आणि सर्वानी चीअर्स केलं.
बाटल्या अध्र्याहून अधिक रिकामी होईपर्यंत सर्व जण एकत्रपणे मजा-मस्करी करीत होते. विनोदी किस्से सांग, जुन्या आठवणींना उजाळा दे, मध्येच टोपीची टेर खेचा हे सर्व झाल्यावर सर्व जण आपापला कोपरा शोधू लागले. अट फक्त एकच, तिथून चांदणं दिसलं पाहिजे. संध्याकाळी अचानक पडून गेलेल्या पावसामुळे हवेत बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे सर्वानी वरुण राजाचे आभार मानले होते. कारण हाच गारवा चांदण्यारात्री खरी धमाल आणणार होता.
पिऊन टुन्न असताना आणि चंद्राकडे बघत गळ्यातगळे घालून पुन्हा एकदा मरेपर्यंत एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्यानंतर सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असताना सगळी जोडपी कधी झोपी गेली ते त्यांचं त्यांनासुद्धा कळलं नाही; पण एक जोडपं जागं होतं. शरद आणि कौमुदी. आपल्या आवडत्या गरम दुधाचा आस्वाद घेतल्यानंतर हे दोघे केव्हाच तिथून बाहेर पडून नदी किनारी येऊन बसले होते. एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून, संथ वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा आवाज ऐकत चांदण्या रात्री एकटक त्या फूल मूनकडे पाहत सूर्याचं पहिलं किरण पडेपर्यंत.




    Wednesday, October 13, 2010

    कधी कधी असं का होतं?

    कधी कधी असं का होतं? 

    स्पर्श केल्याशिवाय स्पर्श जाणवतो,
    प्रत्यक्ष पाहिलं नसतानाही पाहिल्याचा भास होतो,
    फक्त ऐकूनच सुवासाने उल्हासित व्हायला होतं,
    समोरच्याला काय बोलायचंय ते त्याने सांगितल्याशिवायच कळतं,
    कधी कधी असं का होतं? 

    खाल्याशिवाय पदार्थाची चव जिभेवर रेंगाळते,
    पोट रिकामी असतानाही भरलेलं वाटतं,
    दमडीही नसताना श्रीमंत आणि अब्जादिश असताना गरीब आहोत असं वाटतं,
    नुसतंच बघत असूनसूध्दा आपणच करतोय असं वाटतं,
    कधी कधी असं का होतं? 

    वाचायला येत नसतानाही लिहिलंय त्याचा अर्थ लागतो,
    आयुष्यात पहिल्यांदाच लिहिलेलं कौतुकास पात्र ठरतं,
    वस्त्र परीधान केल्याशिवाय ते आपल्यावरच शोभतं,
    कसलाही मागमूस नसतानाही डोक्यात विचारचक्र सुरु होतं,
    कधी कधी असं का होतं? 

    एकटं बसलेलं असताना खुदकन हसू येतं,
    काही सांगायच्या आतच ढसाढसा रडू कोसळतं,
    रक्ताचं नातं नसतानाही मन भरून येतं,
    दिर्घायुष्य मिळालय असं वाटत असताना अचानक हृदय बंद पडतं,
    कधी कधी असं का होतं?